पंढरपूर हे महाराष्ट्रातील मोठे तिर्थक्षेत्र असून लोकसंख्या ही वरचेवर वाढत आहे त्यात काही कॅन्सर आजाराने त्रस्त नागरिक आहेत त्यांना उपचारासाठी पंढरपुरात सोय नसल्याने बाहेर परगावी उपचारासाठी जावे लागत आहे त्यामुळे त्यांना व त्यांच्या कुटूंबियांना मानसिक , आर्थिक व शारीरिक त्रास होत आहे त्यामुळे पंढरपुरातील उपजिल्हा कॅन्सरग्रस्त रूग्णावर उपचारांची सोय झाल्यास रूग्णांना व पंढरपूरकरांना मोठा दिलासा मिळणार आहे असे श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.
सत्तेमध्ये सहभागी असलेल्या अजितदादा यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेच आरोग्यमंत्र्यांकडे ही मागणी केली असल्यामुळे आता ही मागणी नेमकी कधी मान्य होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे कारण पंढरपूर शहरवासीय व ग्रामीण भागातील कॅन्सरग्रस्त रुग्णांना ही मागणी मंजूर झाल्यानंतर सर्वात मोठा दिलासा मिळणार असून रुग्णवाह त्यांच्या नातेवाईकांचा शारीरिक,मानसिक व आर्थिक त्रासही या मागणीमुळे कमी होणार आहे.